Ticker

6/recent/ticker-posts

Tur Cultivation : विक्रमी उत्पादनासाठी निवडा राहुरी विद्यापीठाने विकसित केलेले तुरीचे हे वाण!

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा खरीप हंगामासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात या तीन राज्यांसाठी प्रसारीत करण्यात आलेले असून सुमारे आठ वर्षांपासून या वाणाचे संशोधन सुरु होते.राज्यातील पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये तुरीचा बहुतांश भाग सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे.विद्यापीठाने तुरीचे फुले राजेश्वरी हे विकसित केले असून हे वाण महाराष्ट्रासाठी शिफारशीत करण्यात आले आहे.राज्यात या जातीच्या तुर पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.अहमदनगर, सोलापूर आणि नाशिक या जिल्ह्यात या वाणाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे.


फुले राजेश्वरी वाणाचे वैशिष्ट्ये -

विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाणाची पेरणी केल्यानंतर साधारणता १५० दिवसात पीक तयार होते.

हे वाण मर आणि वांझ रोगास प्रतिकारक आहे.
दाणे मध्यम आणि लाल रंगाचे असतात तसेच बाजारात या जातीच्या वाणाला मोठी मागणी आहे.

तुरीच्या या वाणापासून शेतकऱ्यांना १२ ते १४  क्विंटल प्रति एकरपर्यंतचे उत्पादन मिळू शकते असा दावा केला आहे, या तुरीच्या जातीतूपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.

पेरणी करताना एकरी एक किलो बियाणे पुरेसे ठरते, म्हणजे या जातीपासून कमी उत्पादन खर्चात अधिकचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळवता येते.

विद्यापीठात झालेले प्रयोग पूर्वी तुरीची दोन बाय एक फूट किंवा तीन बाय एक फूट अशी लागवड केली जायची. विद्यापीठाने नव्या तंत्रज्ञानासोबत लागवड पद्धतीचे प्रयोग केले. त्यानुसार शाश्‍वत उत्पादनासाठी तुरीची लागवड चार बाय एक फूट अंतरावर करण्याची शिफारस केली.आंतरपीक पद्धतीत दोन ओळी तुरीच्या व चार ओळी सोयाबीनच्या घेतल्यास या प्रयोगातून पंधरा ते वीस टक्के उत्पादन वाढ झाल्याचे आढळले आहे. कोरडवाहू भागात तुरीची लागवड करण्यासाठी पाण्याचा ताण सहन करण्यासाठी पुसा हायड्रोजेल अडीच किलो प्रती हेक्टरी व पाच टन पीक अवशेषांचे आच्छादन करण्याची शिफारस करण्यात आली. त्यामुळे कमी पाऊस झाला तरी पिकांचे नुकसान होत नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या