Vegetable Market Rate : पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेला असताना अजूनही मॉन्सूनचा पाऊस आला नाही. त्याचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाल्याचे दिसत आहे.
Nagar News : पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेला असताना अजूनही मॉन्सूनचा पाऊस आला नाही. त्याचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाल्याचे दिसत आहे. सध्या बाजारात पालेभाज्या व वेलवर्गीय भाजीपाल्याची आवक घटली आहे.
नगर येथील बाजार समितीत सध्या भाजीपाला, पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. सध्या दररोज १२८७ क्विंटलपर्यंत एकूण भाजीपाल्याची आवक होत असून त्यात ४५० क्विंटलपर्यंत बटाट्याची आवक होत आहे. सध्या वेलवर्गीय व पालेभाज्याची आवक कमी झाली आहे. पाऊस नसल्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
पावसाळ्यातील सुरुवातीची रोहिणी व मृग नक्षत्र आगदीच कोरडी गेली. गेल्या महिनाभरात साधा पावसाचा सडाही न पडल्याने व त्यातच अजूनही वैशाखासारख्या रखरखत्या उन्हाचा चांगलाच चटका लागत असल्याने बाजारात येणाऱ्या मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू या पालेभाज्यांसह दोडकी, कारली, घोसाळी, दुधीभेपळा, वाल शेंगा, घेवडा, डिंगरी या भाज्यांची आवक घटल्याने या पालेभाज्या व वेलगर्गीय भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
उन्हाळ्यात विहिरींचे, कूपनलिका, बंधारे तलावांतील पाणी कमी झाल्याने साहजिकच बाजारात येणाऱ्या पालेभाज्यांची व वेलवर्गीय भाज्यांची आवक मंदावते. रोहिणीच्या सुरुवातीला व मृग नक्षत्रात या पालेभाज्या व फळभाज्यांची आवक वाढते.
मात्र या वर्षी अद्याप मॉन्सूनच्या पावसाने हजेरी लावली नसल्याने याचा परिणाम बाजारातील भाज्यांच्या आवकेवर झाला आहे. सध्या बाजारात टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची आणि बटाटे सोडले तर इतर भाज्यांची आवक घटली आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro