परिषदेत केळी उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जळगाव: महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघातर्फे रविवारी रावेर तालुक्यातील सावदा येथे पहिली राज्यस्तरीय केळी परिषद आयोजित करण्यात आली असून, यात राज्यभरातील विविध तज्ज्ञ शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. केळीला हमीभाव मिळण्यासह उत्पादकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी परिषदेत विचारमंथन करण्यात येणार आहे. तसेच राज्यात एकरी तीन टनांपेक्षा अधिक उत्पादन घेणाऱ्या केळी उत्पादकांना गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण यांनी दिली.
राज्यातील केळी उत्पादकांची सद्यःस्थिती बरीचशी नाजूक असून, अवकाळी पाऊस, गारपीट, रोग, बनावट रोपे, बनावट कीटकनाशक औषधी, तसेच विमा कंपन्यांनी व व्यापार्यांकडून होत असलेली शेतकर्यांची पिळवणूक या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी केळी शेतीतील तज्ज्ञ शेतकरी आणि पूरक उद्योजकांनी या परिस्थितीवर चर्चा करून ठोस उपाययोजना सुचविण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठीच केळी भागातील सावदा येथील प्रभाकर बहुद्देशीय सभागृहात रविवारी सकाळी ११ वाजता राज्यस्तरीय केळी परिषद घेण्यात येत आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro